• मुख्य मजकुराकडे
  • Language Selection Icon
  • प्रवेशयोग्यता दुवे प्रवेशयोग्यता चिन्ह
    बंद

    कृषी विभाग

    भारत हा कृषि प्रधान देश असून कृषि हा अर्थ व्यवस्थेचा आधारस्तंभ मानला जातो. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी शेतीच्या उत्पादनवाढीची गरज १९ व्या शतकात जाणवायला लागली. स्वातंत्र्योत्तर काळातील हरीतक्रांती पूर्वकाळ म्हणजे सन १९५० ते १९६५. या टप्यात शेतीच्या विकासाला चालना देण्यासाठी अनेक योजना आखल्या गेल्या. याकाळात लागवडीखालील क्षेत्राच्या विस्ताराबरोबच सिंचनाखालील क्षेत्र वाढवण्यावर भर दिला गेला. सन १९६१-६२ मध्यें रासायनिक खतांच्या वापरासाठी विशेष मोहीम हाती घेण्यांत आली.

    सन १९६५-६६ पासून विविध पिकांच्या संकरीत वाण निर्मितीमुळे देशांत हरितक्रांतीचा पाया घातला गेला. यानंतरच्या काळातील पंचवार्षिक योजनांद्वारे शेती विकासावर विशेष भर देण्यांत आला. कृषि उत्पादन वाढीसाठी सधन शेती पध्दतीद्वारे बियाणे, खते,कीटकनाशके व उपलब्ध पाण्याचा वापर मोठया प्रमाणावर सुरु झाला त्यामुळे कृषि उत्पादन वाढीस मदत झाली नंतर या गोष्टींचा शास्त्रोक्त पध्दतीने वापर व्हावा यासाठी शेतक-यांना अधिक मार्गदर्शनाची निकड लक्षात घेवून कृषि विद्यापीठातील सुधारीत तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतक-यांपर्यत पोचवण्यासाठी आखलेल्या पीक प्रात्यक्षीके, प्रक्षेत्र भेटी, प्रचारसभा, चर्चासत्रे, मेळावे, प्रदर्शने इत्यादी कार्यक्रमांच्या परिणामकारक अंमलबजावणीमुळे कृषि उत्पादनवाढीमध्यें मोलाची भर पडली.

    अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण झालो असलो तरी अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता हे राज्याचे एकमेव उद्दीष्ट नसून शेतक-यांना उपलब्ध संसाधनांचा परिपूर्ण वापर करुन अधिकाधिक आर्थिक फायदा मिळवून देणे नितांत गरजेचे आहे.यासाठी व्यापारक्षम शेतीची कास धरावी लागेल. मुक्त आर्थिक व्यवस्था व जागतीक व्यापार व्यवस्थेचा फायदा करुन घेण्याच्या दृष्टिने कृषि फलोत्पादन कृषि उत्पादन वाढ, निर्यातवृध्दी व कृषि प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या अनेकविध योजना राबविण्यांत येत आहेत. अशाप्रकारे शेतीव्यवसायातून स्वयंपूर्णते बरोबरच आर्थिक उन्नती साधणे व जागतीक शेतमालाच्या बाजारपेठेत महत्वाचे स्थान मिळविणे यासाठी शेतकऱ्यांमध्ये जाणीव-जागरुकता निर्माण करणे हे उद्दिष्ट ठेऊन व बहुजन हिताय, बहुजन सुखाय या उक्तीप्रमाणे कृषि विभाग, जिल्हा परिषद पुणे कार्यरत आहे.

    पुणे जिल्हयात एकुण 13 तालुक्यांचा समावेश असून जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्रफळ 15,62,018 हे. असून लागवडीखालील निव्वळ क्षेत्र 9,91,787 हे. (75.9%).

    हंगामनिहाय पीकांखालील क्षेत्र – खरीप हंगाम – 1,95,710 हे. रब्बी हंगाम – 2,29,712 हे. उन्हाळी – 11,094 हे. पुणे जिल्हयाच्या हवामान वैशिष्टयांचा विचार करता जिल्हयाचे सर्वसाधारण हवामान उष्ण आहे. पश्चिमेकडील हवामान थंड तर मध्य भागातील कोरडे असून पुर्वेकडील तालुक्यांमध्ये उष्ण व कोरडे आहे. जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान 845.8 मिमि. असून जुन ते ऑक्टोंबर कालावधीमध्ये बहुतांश पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडतो. पुर्वेकडील तालुक्यांत ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पुर्वेकडे कमी होत जाते. महत्वाची वेबपेजेस

    कृषि विभाग, महाराष्ट्र राज्य – https://krishi.maharashtra.gov.in/

    https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login

    कृषि निविष्ठा परवाने – https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en

    जिल्हा परिषद, पुणे – कृषि विभाग अंतर्गत राबविण्यात येणा-या योजना

    • जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना
    • जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जमाती) : बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील)

    योजनेत मिळणा-या बाबनिहाय अनुदानाचा तपशिल

    अ.क्र. बाब उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये)
    1 नवीन सिंचन विहीर 4,00,000/-
    2 जुनी विहीर दुरुस्ती 1,00,000/-
    3 शेततळयाचे प्लॅस्टिक अस्तरीकरण 2,00,000/-
    4 इनवेल बोअरिंग 40,000/-
    5 वीजजोडणी  आकार 20,000/-
    6 पंपसंच (डिझेल/ विद्युत) 40,000/-
    7 सोलरपंप (वीजजोडणी आकार व पंपसंच ऐवजी) 50,000/-
    8 एचडीपीई/ पीव्हीसी पाईप 50,000/-
    9 तुषार सिंचन संच पूरक अनुदान 47,000/-
    10 ठिबक सिंचन संच पूरक अनुदान 97,000/-
    11 यंत्रसामुग्री (बैलचलित/ ट्रॅक्टरचलित  अवजारे) (नवीन बाब) 50,000/-
    12 परसबाग 5,000/-
    13 विंधन विहीर (नवीन बाब) 50,000/-

    कृषी निविष्ठा गुणवत्ता नियंत्रण विभागाचे कामकाज

     उत्पादक, वितरक व विक्रेते स्तरावर नमुने काढणे त्यांचे अधिसूचित गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा मधून विश्लेषण करणे व अप्रमाणिक नमुन्यांवर पुढील न्यायालयीन प्रक्रिया पार पाडले.

    1. उत्पादक, वितरक व विक्रेते कडील उत्पादन केंद्र, प्रयोगशाळा, साठवणूक केंद्र, विक्री केंद्र इत्यादींची तपासणी करणे.
    2. कायदेशीर बाबींचे उल्लंघन, संशयित निविष्ठा, अनाधिकृत, बोगस, अप्रमाणिक निविष्ठा संदर्भात विक्री बंद आदेश देणे, जप्ती करणे व पुढील कायदेशीर कार्यवाही करणे.
    3. जिल्ह्यामध्ये खतांचा होणारा पुरवठा व विक्री यावर सनियंत्रण करणे.

    जिल्ह्यामध्ये निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण करण्यासाठी जिल्हास्तर व तालुकास्तरावर्ती तक्रार निवारण कक्ष स्थापन केले जातात ते खालील प्रमाणे

    निविष्ठा गुणवत्ता अभियान जिल्हास्तर / तालुकास्तर भरारी पथक रचना

    जिल्हा स्तर

    अ. क्र. अधिकारी पदनाम
    1 कृषि विकास अधिकारी, जि.प. पथक प्रमुख
    2 उपविभागीय कृषि अधिकारी, (संबंधित क्षेत्र) सदस्य
    3 मोहिम अधिकारी कृषी विभाग, जि.प. सदस्य
    4 निरीक्षक वजन मापे सदस्य
    5 जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक सदस्य सचिव

    तालुका स्तर

    अ. क्र. अधिकारी पदनाम
    1 तालुका कृषी अधिकारी पथक प्रमुख
    2 कृषि अधिकारी, तालुका कृषी कार्यालय सदस्य
    3 निरीक्षक वजन मापे सदस्य
    4 मंडळ कृषी अधिकारी (संबंधित क्षेत्र) सदस्य
    5 कृषी अधिकारी, पंचायत समिती सदस्य सचिव

    माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 4(1)(ख) नुसार 1 ते 17 बाबी ची माहिती